मित्र…कुणी त्याला दोस्त म्हणतं, कुणी यार म्हणतं, तर कुणी ‘ए भिडू’ असं म्हणत खांद्यावर हात ठेवतो. आपल्या आनंदात सहभागी होणारा आणि दु:खातही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तो मित्रच.
ऑगस्ट महिना उजाडला की वेध लागतात ते फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्री साजरी करण्याच्या दिवसाचे. या महिन्यात पहिल्या रविवारी येणारा हा फ्रेंडशिप डे म्हणजे तरुणांचा जणू सणच असतो. कॉलेजमधील उत्साहाच्या वातावरणात अजून भर टाकणारा हा दिवस वातावरणच बदलून टाकतो. मग ऑगस्टचा पहिला आठवडा हा मैत्रीच्या आनंदी नात्यामध्ये सर्वाना गुरफटवून टाकणारा जातो.
एक दुसऱ्याबद्दल असणारी ओढ, जिव्हाळा म्हणजे मैत्री. प्रेमाची पहिली पायरी असते मैत्री. मैत्री केल्याशिवाय प्रेम वाढू शकत नाही. मैत्रीची भावना खरोखरच आनंद देणारी आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारी असते. मित्र / मैत्रीणच असते आपल्या हक्काची.मैत्री हसणारी असावी .मैत्री चिडवणारी असावी प्रत्येक क्षाणाचा आनंद घेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी . आपल्या सुख-दुःखात साथ देणारी. आपल्या भावना व्यक्त न करताच समजून घेणारी. प्रसंगी हक्काने मदत करणारी. पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी व्यक्ती.
आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरीही तू चल ,आम्ही आहोत असे म्हणणारे मित्र भेटायला खरंच खूप नशीब लागतं. मित्रांच्या फक्त एका शब्दाखातीर जीवाची बाजी लावायला आपण तयार असतो कारण ते असतातच असे कलंदर... कोणतीही गोष्ट हक्काने मागायचे बिनधास्त ,बेधडक बोलण्याचे ठिकाण आणि वेळप्रसंगी कान धरणारे हे फक्त आणि फक्त मित्रच असतात. मित्राचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कर्ण. कर्णाचा मित्रासाठी त्याग, तो म्हणजे मित्रासाठीच वाट्टेल ते करणारा निश्रयी माणूस. दुर्योधनासारख्या वाईटाच्या मार्गी लागूनही त्याला अखेरपर्यंत न सोडणारा मित्र, त्याचा विश्वासघात न करणारा विश्वासू कर्ण. इतिहासात अजरमर होणारा असा हा कर्ण.
औकात का पता चलता हैं..
बढते हैं जब हाथ उठाने को,
अपनोंका पता चलता हैं.."




